HomeArchiveमत्स्य उद्योगाला बसला...

मत्स्य उद्योगाला बसला जीएसटीचा फटका

Details
मत्स्य उद्योगाला बसला जीएसटीचा फटका

    03-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
केंद्र सरकारने मत्स्य उद्योगाला ५ टक्के जीएसटी लावल्याने त्याचा मोठा फटका मत्स्य उद्योगांना बसला आहे. त्यामुळे फिश मिल कंपन्यांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. फिश मिल कंपन्यांच्या संपामुळे त्यांनी मासेखरेदी बंद केली आहे. त्यामुळे मच्छिमार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मत्स्य उद्योगाला जीएसटी मधून वगळावे, अशी आग्रही मागणी वेसावा नाखवा मंडळचे (ट्रॉतर)चे अध्यक्ष देवेंद्र काळे व सचिव पराग भावे यांनी केली आहे.
 
 
गेली दोन ते तीन वर्षे मच्छिमारांना मासळी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मासळीचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर फक्त ७५ टक्के मासळी ही खाण्यायोग्य असते तर उर्वरित मासळी ही फिश मिलला दिली जाते. मात्र फिश मिलच्या संपामुळे वर्सोव्याच्या मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली आहे, असे ते म्हणाले.
 
 
१ जून ते ३१ जुलै या काळात मासेमारीला राज्यात बंदी असते. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरूवात झाली. मासळीदेखील मिळू लागली. मात्र, फिश मिलच्या संपामुळे मासळीला उठाव नसल्याने मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई, कुलाबा, वरळी, माहीम, खार दांडा या कोळीवाड्यांसह ससून डॉक, भाऊंचा धक्का येथील घाऊक मासळी विक्री केंद्रावर मासळीला उठाव नसल्याने मासळी कवडीमोल भावाने विकावी लागते, अन्यथा ती फेकून द्यावी लागते. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे, असे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके व प्रवीण भावे यांनी सांगितले.
याप्रकरणी कोळी महासंघाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे आमदार रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच कोळी महासंघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार असून मत्स्य उद्योगाला जीएसटीमधून वेगळावे, अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
“केंद्र सरकारने मत्स्य उद्योगाला ५ टक्के जीएसटी लावल्याने त्याचा मोठा फटका मत्स्य उद्योगांना बसला आहे. त्यामुळे फिश मिल कंपन्यांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. फिश मिल कंपन्यांच्या संपामुळे त्यांनी मासेखरेदी बंद केली आहे. त्यामुळे मच्छिमार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मत्स्य उद्योगाला जीएसटी मधून वगळावे, अशी आग्रही मागणी वेसावा नाखवा मंडळचे (ट्रॉतर)चे अध्यक्ष देवेंद्र काळे व सचिव पराग भावे यांनी केली आहे.”
 
 
“गेली दोन ते तीन वर्षे मच्छिमारांना मासळी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मासळीचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर फक्त ७५ टक्के मासळी ही खाण्यायोग्य असते तर उर्वरित मासळी ही फिश मिलला दिली जाते. मात्र फिश मिलच्या संपामुळे वर्सोव्याच्या मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली आहे, असे ते म्हणाले.”
 
 
“१ जून ते ३१ जुलै या काळात मासेमारीला राज्यात बंदी असते. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरूवात झाली. मासळीदेखील मिळू लागली. मात्र, फिश मिलच्या संपामुळे मासळीला उठाव नसल्याने मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई, कुलाबा, वरळी, माहीम, खार दांडा या कोळीवाड्यांसह ससून डॉक, भाऊंचा धक्का येथील घाऊक मासळी विक्री केंद्रावर मासळीला उठाव नसल्याने मासळी कवडीमोल भावाने विकावी लागते, अन्यथा ती फेकून द्यावी लागते. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे, असे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके व प्रवीण भावे यांनी सांगितले.”
“याप्रकरणी कोळी महासंघाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे आमदार रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच कोळी महासंघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार असून मत्स्य उद्योगाला जीएसटीमधून वेगळावे, अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.”

Continue reading

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...
Skip to content