HomeArchiveबारवी धरणाची उंची...

बारवी धरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई नाही : सुभाष देसाई

Details
बारवी धरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई नाही : सुभाष देसाई

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प आज पूर्ण झाला असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेनुसार भरले आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले म्हणून बारवी धरणाचे जलपूजन गुरूवारी भरपावसात आनंदी वातावरणात उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरूण कटाळे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते.

या धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली, प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असे देसाई यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांतील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे, आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाण्याची पातळी वाढल्याने कोळेवडखळ गावात पाणी शिरलं आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे शासनाचे धोरण असल्याचे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प आज पूर्ण झाला असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेनुसार भरले आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले म्हणून बारवी धरणाचे जलपूजन गुरूवारी भरपावसात आनंदी वातावरणात उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरूण कटाळे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते.

या धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली, प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असे देसाई यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांतील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे, आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाण्याची पातळी वाढल्याने कोळेवडखळ गावात पाणी शिरलं आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे शासनाचे धोरण असल्याचे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.”

Continue reading

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...
Skip to content