Details
पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने दिले १० कोटी
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
साईबाबा संस्थान विश्वीस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यामंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्किळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.
यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्था्न विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने घेण्यात आला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्याासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
साईबाबा संस्थान विश्वीस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यामंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्किळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.
यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्था्न विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने घेण्यात आला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्याासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.”

