HomeArchiveदेवेंद्र भुजबळ प्रेरणा...

देवेंद्र भुजबळ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

Details
देवेंद्र भुजबळ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वतःच्या कामाची समाजासमोर प्रभावी ओळख निर्माण केल्याबद्दल आणि विविध क्षेत्रातील प्रसंशनीय जनसेवेबद्दल राज्याचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना नुकतेच प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील पत्रकार भवनात झालेल्या प्रेरणा साहित्य संमेलनात सम्मेलनाचे अध्यक्ष जगदगुरू महास्वामी डॉ. रंगनाथ नाथराव जोशी, सिद्धीमहायोगपीठाधिश्वर, महाशक्तीपीठ, तुळजापूर, इतिहास संशोधक,साहित्यिक भा. ल. ठानगे, सहायक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक डॉ. नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जगदगुरू महास्वामी श्री. श्री. डॉ. रंगनाथ नाथराव जोशी यांनी आपल्या रसाळ वाणीने विश्वशांतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच माणसामाणसातील परस्पर संबंध दृढ होण्याची गरज समजावून सांगितली. यावेळी विचारवंत अजय महाजन, भारताच्या संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी महेश अयंगार, गप्पागोष्टीकार जयंत ओक, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूपाल रावळ, चित्रकार प्रतिभा रावळ, सामाजिक कार्यकर्ते उदय घोरपडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या भरगच्च सम्मेलनात काही पुस्तकांचे प्रकाशन, कवी सम्मेलन, व्याख्यानेही झाली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वतःच्या कामाची समाजासमोर प्रभावी ओळख निर्माण केल्याबद्दल आणि विविध क्षेत्रातील प्रसंशनीय जनसेवेबद्दल राज्याचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना नुकतेच प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील पत्रकार भवनात झालेल्या प्रेरणा साहित्य संमेलनात सम्मेलनाचे अध्यक्ष जगदगुरू महास्वामी डॉ. रंगनाथ नाथराव जोशी, सिद्धीमहायोगपीठाधिश्वर, महाशक्तीपीठ, तुळजापूर, इतिहास संशोधक,साहित्यिक भा. ल. ठानगे, सहायक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक डॉ. नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जगदगुरू महास्वामी श्री. श्री. डॉ. रंगनाथ नाथराव जोशी यांनी आपल्या रसाळ वाणीने विश्वशांतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच माणसामाणसातील परस्पर संबंध दृढ होण्याची गरज समजावून सांगितली. यावेळी विचारवंत अजय महाजन, भारताच्या संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी महेश अयंगार, गप्पागोष्टीकार जयंत ओक, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूपाल रावळ, चित्रकार प्रतिभा रावळ, सामाजिक कार्यकर्ते उदय घोरपडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या भरगच्च सम्मेलनात काही पुस्तकांचे प्रकाशन, कवी सम्मेलन, व्याख्यानेही झाली.”

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content