HomeArchiveखासदार राहुल शेवाळे...

खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!

Details
खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.

 

दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.

 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.

 

दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.

 
 ”
 
 
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content