Details
खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.
दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.
”
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.
दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.
”