HomeArchiveकृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा...

कृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी द्या – निरंजन डावखरे

Details
कृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी द्या – निरंजन डावखरे

    04-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
जुलैमध्ये झालेल्या बारावीच्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.
 
 
राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला. त्यावर डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.
 
 
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्ट २०१९च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. यासंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च संस्थेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागात करीयर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
“जुलैमध्ये झालेल्या बारावीच्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.”
 
 
“राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला. त्यावर डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.”
 
 
“राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्ट २०१९च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. यासंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च संस्थेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागात करीयर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.”

Continue reading

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...
Skip to content