HomeArchiveअखिल भारतीय स्थानिक...

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा आज दीक्षांत समारंभ

Details
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा आज दीक्षांत समारंभ

    31-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापना दिवस आणि दीक्षांत समारंभ आज शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या मेयर हॉल, स्थानिकराज भवन, सी. डी. बर्फीवाला मार्ग, जुहू लेन, अंधेरी पश्चिम येथे होणार आहे. 
 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बडोद्याचे श्रीमंत महाराजा समरजीतसिंह गायकवाड उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेतर्फे ३५ केंद्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
 
 
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही गेल्या ९३ वर्षांपासून नागरी व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यायोगे नागरी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रगतशील संस्थेतर्फे संस्थांच्या कामकाजात उकृष्ठ दर्जा व प्रावीण्य राखण्यासाठी पाया रचणे, मार्ग शोधणे, क्षमतेत वाढ करणे अशा संस्थांच्या कार्यात गुणात्मक बदल करून त्यांचे स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणात्मक व सुधारित प्रशिक्षण देण्यासाठी रणजित चव्हाण सतत प्रयत्नशील असतात. ३१ ऑगस्ट १९२६ साली त्याकाळच्या ब्रिटिश सरकारच्या आश्रयाने स्थापन झालेल्या या संस्थेला सर्वार्थाने आधुनिक रूप देऊन तिला २१व्या शतकात उत्तुंग शिखरावर नेण्यात चव्हाण यांची डायनॅमिक लीडरशिप कारणीभूत आहे. दरवर्षी ३१ ऑगस्टला संस्थेचा स्थापना दिवस व दीक्षांत समारंभ त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

“मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापना दिवस आणि दीक्षांत समारंभ आज शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या मेयर हॉल, स्थानिकराज भवन, सी. डी. बर्फीवाला मार्ग, जुहू लेन, अंधेरी पश्चिम येथे होणार आहे. ”
 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बडोद्याचे श्रीमंत महाराजा समरजीतसिंह गायकवाड उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेतर्फे ३५ केंद्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
 
 
“अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही गेल्या ९३ वर्षांपासून नागरी व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यायोगे नागरी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रगतशील संस्थेतर्फे संस्थांच्या कामकाजात उकृष्ठ दर्जा व प्रावीण्य राखण्यासाठी पाया रचणे, मार्ग शोधणे, क्षमतेत वाढ करणे अशा संस्थांच्या कार्यात गुणात्मक बदल करून त्यांचे स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणात्मक व सुधारित प्रशिक्षण देण्यासाठी रणजित चव्हाण सतत प्रयत्नशील असतात. ३१ ऑगस्ट १९२६ साली त्याकाळच्या ब्रिटिश सरकारच्या आश्रयाने स्थापन झालेल्या या संस्थेला सर्वार्थाने आधुनिक रूप देऊन तिला २१व्या शतकात उत्तुंग शिखरावर नेण्यात चव्हाण यांची डायनॅमिक लीडरशिप कारणीभूत आहे. दरवर्षी ३१ ऑगस्टला संस्थेचा स्थापना दिवस व दीक्षांत समारंभ त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.”

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content