HomeArchive`ओकिनावा’ इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या...

`ओकिनावा’ इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या तयारीत

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“ओकिनावा, या ‘मेक इन इंडिया’वर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘ओकी १००’ ही १०० टक्के स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात आलेले उत्पादन असणार आहे. ब्रॅण्ड भारतीय इलेक्ट्रिक वाहन विभागामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाला चालना देत आला आहे. याच दृष्टिकोनासह ओकिनावाने सांगितले आहे की, बॅटरी सेल्स वगळता आगामी ओकि १००चे सर्व घटक भारतामध्ये उत्पादित करण्यात येणार आहेत.”
 
“बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक बाईक ‘ओकि १००’ प्रतितास १०० किमी.ची अव्वल गती प्राप्त करेल आणि या बाईकमध्ये लिथियम आयन बॅटरी असणार आहे. ऑटो एक्स्पो २०१८मध्ये बाईकच्या प्रोटोटाइपचे अनावरण करण्यात आले होते आणि बाईकमधील सर्वोत्तम तंत्रज्ञान, वैशिष्ट्ये व आकर्षकतेसाठी उपस्थितांनी बाईकचे भरभरून कौतुक केले होते. ही इलेक्ट्रिक बाईक आर्थिक वर्ष २०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये सादर करण्याइत येणार आहे.”
 

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content