HomeArchive`ओकिनावा’ इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या...

`ओकिनावा’ इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या तयारीत

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“ओकिनावा, या ‘मेक इन इंडिया’वर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘ओकी १००’ ही १०० टक्के स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात आलेले उत्पादन असणार आहे. ब्रॅण्ड भारतीय इलेक्ट्रिक वाहन विभागामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाला चालना देत आला आहे. याच दृष्टिकोनासह ओकिनावाने सांगितले आहे की, बॅटरी सेल्स वगळता आगामी ओकि १००चे सर्व घटक भारतामध्ये उत्पादित करण्यात येणार आहेत.”
 
“बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक बाईक ‘ओकि १००’ प्रतितास १०० किमी.ची अव्वल गती प्राप्त करेल आणि या बाईकमध्ये लिथियम आयन बॅटरी असणार आहे. ऑटो एक्स्पो २०१८मध्ये बाईकच्या प्रोटोटाइपचे अनावरण करण्यात आले होते आणि बाईकमधील सर्वोत्तम तंत्रज्ञान, वैशिष्ट्ये व आकर्षकतेसाठी उपस्थितांनी बाईकचे भरभरून कौतुक केले होते. ही इलेक्ट्रिक बाईक आर्थिक वर्ष २०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये सादर करण्याइत येणार आहे.”
 

Continue reading

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...
Skip to content