Homeटॉप स्टोरीमराठा आरक्षणाचे तुम्ही...

मराठा आरक्षणाचे तुम्ही मारेकरी आहात!

मराठा आरक्षणावर बोलणारे हे नेते किती संवेदनशील आहेत हे सर्वांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. उच्च न्यायालयातही ते टिकले. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? तेव्हा मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे प्रमुख कोण होते? त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार यांना नाही. मराठा आरक्षणाचे तुम्ही मारेकरी आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता समाचार घेतला.

मराठा समाजाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे तुम्ही… आता मराठा आरक्षणावर भाष्य करताय? सरकारने दिलेले आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी लागणारे पुरावे द्यायला तुम्ही अपयशी ठरलात. मुद्दाम तुम्ही या आरक्षणाकडे लक्ष दिले नाही. त्यांनी आता मराठा समाजाला भडकवण्याचे काम करू नये, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा

मराठा आरक्षणावर 58 मोर्चे निघाले. हे सर्व मोर्चे अत्यंत शिस्तीत आणि शांततेत काढले गेले. मराठा समाजच मुळात शांतताप्रिय समाज आहे. परंतु आता या आंदोलनाच्या माध्यमातून काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. मराठा समाजाने त्यांच्या शांतताप्रिय परंपरेला गालबोट लागेल असे काही करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content