Homeटॉप स्टोरीमराठा आरक्षणाचे तुम्ही...

मराठा आरक्षणाचे तुम्ही मारेकरी आहात!

मराठा आरक्षणावर बोलणारे हे नेते किती संवेदनशील आहेत हे सर्वांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. उच्च न्यायालयातही ते टिकले. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? तेव्हा मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे प्रमुख कोण होते? त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार यांना नाही. मराठा आरक्षणाचे तुम्ही मारेकरी आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता समाचार घेतला.

मराठा समाजाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे तुम्ही… आता मराठा आरक्षणावर भाष्य करताय? सरकारने दिलेले आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी लागणारे पुरावे द्यायला तुम्ही अपयशी ठरलात. मुद्दाम तुम्ही या आरक्षणाकडे लक्ष दिले नाही. त्यांनी आता मराठा समाजाला भडकवण्याचे काम करू नये, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा

मराठा आरक्षणावर 58 मोर्चे निघाले. हे सर्व मोर्चे अत्यंत शिस्तीत आणि शांततेत काढले गेले. मराठा समाजच मुळात शांतताप्रिय समाज आहे. परंतु आता या आंदोलनाच्या माध्यमातून काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. मराठा समाजाने त्यांच्या शांतताप्रिय परंपरेला गालबोट लागेल असे काही करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content