Homeपब्लिक फिगरज्याच्या पाठीशी बार्शी...

ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सगळीकडेच सरशी!

आ. राजेंद्र राऊत हे बार्शीचे भागीरथ आहेत. बार्शीकरांनी जसे आ. राजेंद्र राऊत यांच्यावर प्रेम केले तसाच आशीर्वाद ते अर्चना पाटील यांना देतील हा माझा विश्वास आहे. कारण ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सगळीकडेच सरशी, असे उद्गार भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काला काढले.

धाराशिव लोकसभा महायुती (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शी, सोलापूर येथे आयोजित जाहीर सभेत फडणवीस उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते.

जो झुकतो तो नाही तर जो झुकवतो तो नेता असतो. देशाला मजबूर नाही मजबूत नेत्याची गरज आहे आणि असे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. देश राहिला तरच आपण राहू म्हणूनच पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी पोहोचवणे गरजेचे आहे. आज अर्चना पाटील यांना मत देऊन देश मजबूत करण्याची संधी बार्शीकरांकडे आहे. बार्शीकर मोठ्या प्रमाणात समर्थन देऊन अर्चना पाटील यांना संसदेत पाठवतील हा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

यावेळी मंत्री डॉ. तानाजी सावंत, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. राजेंद्र राऊत, आ. राणा जगजीतसिंह पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content