Homeहेल्थ इज वेल्थथॅलेसेमिया रोखण्यासाठी त्याचे...

थॅलेसेमिया रोखण्यासाठी त्याचे वेळेवर निदान गरजेचे!

थॅलेसेमिया आजाराचा सामना करण्यासाठी त्याचे वेळेवर निदान आणि प्रतिबंध करणे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. योग्य वेळी प्रतिबंध केला, तरच या आजाराची जोखीम कमी करता येईल. थॅलेसेमियाचा सामना करण्यासाठी वेळेवर निदान आणि प्रतिबंध ही सर्वात प्रभावी धोरणे आहेत. देशात सुमारे 1 लाख थॅलेसेमिया रुग्ण असून, दरवर्षी अंदाजे 10,000 नवीन रुग्णांची यात भर पडत आहे, असे ते म्हणाले. स्क्रिनिंगद्वारे वेळेवर तपासणी करून सक्रियपणे हस्तक्षेप करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

या विषयावर व्यापक जनजागृतीची गरज त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की, आजही अनेक जणांना या आजाराबद्दल आणि तो कसा रोखता येईल, याबद्दल माहिती नाही. या क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांनी थॅलेसीमियाबद्दल जागरुकता वाढवण्याच्या देशव्यापी मोहिमेसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, त्यांनी थॅलेसेमिया आजाराला प्रतिबंध करणाऱ्या प्रभावी पद्धती आणि सर्वोत्तम उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्स अँड थॅलेसेमिक्स इंडियाच्या सहकार्याने तयार केलेला व्हिडिओ प्रदर्शित केला. केंद्रीय आरोग्य सचिवांनी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सध्याच्या प्रजनन आणि बालआरोग्य कार्यक्रमांतर्गत थॅलेसेमिया चाचणी अनिवार्य करण्याची शिफारस केली.

काही राज्यांनी त्यांच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये याचा समावेश केला असून, इतर राज्यांना थॅलेसेमिया आजाराचे स्क्रीनिंग आणि चाचणीचा समावेश करून त्याचा विस्तार करण्याचा आग्रह केला जाईल. थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्त विकार असून त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य पातळीच्या खाली राहते. दरवर्षी साजरा केला जाणारा, आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन हा रोग प्रतिबंधाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी, जागरुकता वाढवण्यासाठी, भागधारकांमध्ये संवेदना निर्माण करण्यासाठी, लवकर निदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि थॅलेसेमियाने प्रभावित झालेल्यांसाठी दर्जेदार काळजी सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो, असेही अपूर्व चंद्रा म्हणाले.  

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content