Homeमुंबई स्पेशलउद्या चेंबूर परिसरातल्या...

उद्या चेंबूर परिसरातल्या काही भागात पाणी नाही!

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उद्या, बुधवार ते गुरुवार, ३० मेदरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर परिसरातल्या काही भागांना उद्या बुधवारी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात नसणार पाणी-

१) एम पूर्व विभाग (बीट क्रमांक १४७ ते १४८)– लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, एच. पी. सी. एल. वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, बी. ए. आर. सी., वरुण बेवरेजेस (बुधवार, दिनांक २९.०५.२०२४  रोजी सकाळी १०.०० ते गुरुवार, दिनांक ३०.०५.२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

पाणी

२) एम पश्चिम विभाग (बीट क्रमांक १५४ ते १५५)- माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन, आर. सी. मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक चेंबूर छावणी (बुधवार, दिनांक २९.०५.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून गुरुवार, दिनांक ३०.०५.२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा तसेच पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content