Homeएनसर्कलरविंद्र वायकरांच्या प्रचारात...

रविंद्र वायकरांच्या प्रचारात उतरले तृतीयपंथीय!

जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे आमदार आणि उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या विकासकामांमुळे प्रभावित झालेल्या या परिसरातील तृतीयपंथियांनी आता वायकर यांच्या प्रचारातही उडी घेतली आहे. रविवारी शंभरपेक्षा जास्त तृतीयपंथियांनी दिंडोशी परिसरात घरोघरी जाऊन वायकर यांच्याकरीता मतांचा जोगवा मागितला.

आपल्या कार्यकुशलतेने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून जोगेश्वरीला एक वेगळी ओळख निर्माण करून वायकर यांनी जोगेश्वरीकरांच्या मनामध्ये स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांनी प्रभावित झालेल्या तृतीयपंथियांनीही त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत १००पेक्षा जास्त तृतीयपंथियांनी दिंडोशी परिसरात वायकरांटा प्रचार केला.

तृतीयपंथियांनी आमदार वायकरांची भेट घेऊन समाजात त्यांना भेडसवणार्‍या समस्यासंदर्भात चर्चा केली होती. यात तृतीयपंथियांसाठी कुठेच शौचालयाची व्यवस्था नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते. तृतीयपंथियांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन वायकर यांनी तातडीने गोरेगाव (पूर्व) आरे चेकनाका येथे उभारलेल्या उद्यानामध्ये तृतीयपंथीसाठी शौचालय उभारले. वायकर यांच्या या व अन्य कामाने प्रभावित झालेले तृतीयपंथी त्यांच्या प्रत्येक कार्यात ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे ठरवले आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच तृतीयपंथियांनी वायकर यांची भेट घेतली होती. नुसती भेट न घेता त्यांच्यासमवेत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यानुसारच द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून १००पेक्षा जास्त तृतीयपंथियांनी दिंडोशी, गोरेगाव (पूर्व) येथील क्रांतीनगर, रामलीला मैदान, पाणबुडी, पिंपरीपाडा ते इंदिरानगरपर्यंत वायकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content