Homeटॉप स्टोरी20 मेला होणार...

20 मेला होणार 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये 13 मतदारसंघातल्या 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पाचव्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे:

धुळे- 18, दिंडोरी- 10, नाशिक- 31, पालघर- 10, भिवंडी- 27, कल्याण- 28, ठाणे- 24, मुंबई उत्तर- 19, मुंबई उत्तर-पश्चिम- 21, मुंबई उत्तर-पूर्व- 20, मुंबई उत्तर-मध्य- 27, मुंबई दक्षिण-मध्य- 15 आणि मुंबई-दक्षिण- 14.

या आहेत मुंबईतल्या प्रमुख लढती

उत्तर मुंबई- पीयूष गोयल (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

उत्तर-पश्चिम मुंबई- अमोल कीर्तिकर (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध रविंद्र वायकर (शिवसेना).

उत्तर-पूर्व मुंबई- नंदेश उमप (बहुजन समाज पार्टी) विरूद्ध मिहिर कोटेचा (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध संजय पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे).

उत्तर-मध्य मुंबई- ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस).

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध यामिनी जाधव (शिवसेना).

दक्षिण-मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध राहुल शेवाळे (शिवसेना).

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content