Homeटॉप स्टोरी20 मेला होणार...

20 मेला होणार 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये 13 मतदारसंघातल्या 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पाचव्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे:

धुळे- 18, दिंडोरी- 10, नाशिक- 31, पालघर- 10, भिवंडी- 27, कल्याण- 28, ठाणे- 24, मुंबई उत्तर- 19, मुंबई उत्तर-पश्चिम- 21, मुंबई उत्तर-पूर्व- 20, मुंबई उत्तर-मध्य- 27, मुंबई दक्षिण-मध्य- 15 आणि मुंबई-दक्षिण- 14.

या आहेत मुंबईतल्या प्रमुख लढती

उत्तर मुंबई- पीयूष गोयल (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

उत्तर-पश्चिम मुंबई- अमोल कीर्तिकर (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध रविंद्र वायकर (शिवसेना).

उत्तर-पूर्व मुंबई- नंदेश उमप (बहुजन समाज पार्टी) विरूद्ध मिहिर कोटेचा (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध संजय पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे).

उत्तर-मध्य मुंबई- ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस).

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध यामिनी जाधव (शिवसेना).

दक्षिण-मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध राहुल शेवाळे (शिवसेना).

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content