Homeडेली पल्सप्राचीन शिलाईतंत्राद्वारे बांधलेले...

प्राचीन शिलाईतंत्राद्वारे बांधलेले जहाज आजपासून नौदलाच्या सेवेत!

कारवारच्या नौदल तळावर प्राचीन शिलाईतंत्राचा वापर करून बांधलेल्या जहाजाला आज भारतीय नौदलाकडून समारंभपूर्वक आपल्या ताफ्यात दाखल केले जाणार आहे. या समारंभातच या जहाजाच्या नावाचेही अनावरण होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून ते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही भूषवतील. त्यांच्या हस्तेच हे जहाज औपचारिकपणे भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील केले जाणार आहे.

प्राचीन शिलाईतंत्राचा वापर करून बांधलेले हे जहाज, अजिंठा लेण्यांमधील एका चित्रावरून प्रेरणा घेत साकारलेली पाचव्या शतकातील एका जहाजाची प्रतिकृती आहे. जुलै 2023मध्ये सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि मे. होडी इनोव्हेशन्स यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानंतर, या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने आर्थिक पाठबळ दिले. या जहाजाच्या प्रत्यक्ष बांधणीची मुहूर्तमेढ 12 सप्टेंबर 2023 रोजी झाली. प्राचीन शिलाईतंत्राचा वापर असलेल्या या जहाजाची, संपूर्ण बांधणी पारंपरिक पद्धतीने आणि परंपरागत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करूनच केली गेली आहे. केरळमधील आघाडीचे जहाजबांधणी कारागीर बाबू शंकरन यांच्या नेतृत्त्वाखालील कारागिरांच्या हजारो हातांनी शिलाईतंत्राचा वापर करून जहाजाच्या सांध्यांची बांधणी केली आहे. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2025मध्ये गोव्यातील मे. होडी शिपयार्डमध्ये या जहाजाचे जलावतरण केले गेले.

आज हे जहाज नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर, या प्रकल्पाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्याअंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने या जहाजाच्या पारंपरिक सागरी व्यापारी मार्गांवरून महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक सागरी सफरीचा प्रारंभ केला जाईल. या जहाजाच्या सागरी सफरीमुळे भारताच्या प्राचीन सागरी वाहतुकीचे युग पुन्हा जिवंत होईल. या जहाजाच्या पहिल्यावहिल्या सागरी सफरीअंतर्गत गुजरातपासून ओमानपर्यंतची आंतरमहासागरीय सफरीची तयारी नौदलाने चालवली आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content