Homeबॅक पेजपर्यटकांसाठी आकर्षण ठरतेय...

पर्यटकांसाठी आकर्षण ठरतेय मुंबईतले शिल्पग्राम उद्यान

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात आलेले मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान मुंबईतल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्यानजीक जोगेश्वरीतल्या पूनमनगर येथे आहे. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, त्यांची जीवनपद्धती यांच्या संकल्पनेवर आधारित हे उद्यान बारा बलुतेदारबरोबर प्राचीन खेळ, नृत्य यांची शिल्पेही विविध भागात उभारण्यात आली आहेत. सध्या हे पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

शिल्पग्राममध्ये या शिल्पांसोबत लहान मुलांना खेळण्याची विविध उपकरणे, संगीतमय कारंजेदेखील उपलब्ध आहेत. खुला रंगमंच, आकर्षक पायवाटा, हिरवळ इत्यादी सुविधांची उपलब्धता असल्याने अनेक आबालवृद्ध त्याचा लाभ घेत आहेत. शिल्पग्राम उद्यान ५५,००० चौ.मी क्षेत्रफळावर वसले असून उद्यान, खेळ, संगीतमय कारंजे, दिव्यांगांसाठी विशेष उपकरणे तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.

या सुविधांसोबतच विविध प्रकाराच्या वनस्पती, वेली, फुलझाडे, यांनी शिल्पग्रामची शोभा वाढवली आहे. सध्या बहावा, ताम्हण, सोनमोहोर, चाफा, कैलासपती, कांचन, इत्यादी वृक्ष फुलांनी बहरलेले आहेत. बचतगटांच्या विविध उपक्रमांना योग्य व्यासपीठ मिळवण्याच्या हेतूने शिल्पग्राममध्ये आठवडी बाजारदेखील भरविण्यात येतो. एकंदर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मौजमजा, खेळाबरोबर सुंदर हिरवाई पाहण्यासाठी सर्व आबालवृद्धांनी शिल्पग्रामला भेट नक्की द्यायला हवी, असे मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

शिल्पग्राम बुधवार वगळता सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांच्या वापराकरिता उपलब्ध करण्यात आले आहे. शिल्पग्राममध्ये प्रौढांकरिता  रु. १०/-, तसेच १२ वर्षांखालील मुलांसाठी ५/- प्रवेश शुल्क आकारण्यात येते. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना शिल्पग्राममध्ये निशुल्क प्रवेश दिला जातो.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content