Homeडेली पल्सनौदलातर्फे कमांडर अभिलाष...

नौदलातर्फे कमांडर अभिलाष टॉमी (नि.) यांचा सत्कार!

गोल्डन ग्लोब रेस (जीजीआर) 2022 ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय नागरिक, कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी त्यांचा गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

29 एप्रिल 2023 रोजी कमांडर अभिलाष टॉमी यांनी इतिहास रचत जीजीआर 2022 ही शर्यत दुसऱ्या क्रमांकासह जिंकली. तसेच ही शर्यत पूर्ण करणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले. 04 सप्टेंबर 2022 रोजी किनाऱ्यावरून प्रयाण केल्यापासून 236 दिवस, 14 तास आणि 46 मिनिटांचा जलप्रवास पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेच्या कस्टर्न न्यूशॉफर पाठोपाठ फ्रान्सच्या लेस सेबल्स-डी’ओलोनच्या किनाऱ्यावर परतत कमांडर अभिलाष टॉमी यांनी दुसऱ्या क्रमांकाने ही शर्यत पूर्ण केली.

यापूर्वी, वर्ष 2013मध्ये, कमांडर टॉमी आयएनएसव्ही म्हादेई या बोटीवरून एकटे, विना थांबा, जग प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांनी जीजीआर 18 मध्ये देखील भाग घेतला होता मात्र, जलप्रवासादरम्यान त्यांची बोट वादळामध्ये अडकली आणि त्यावेळी पाठीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना या स्पर्धेतून माघार घावी लागली होती.

पाच वर्षानंतर, कण्यातील टायटॅनियम रॉड आणि पाच एकमेकांशी जोडले गेलेले मणके यांच्यासह त्यांनी मानवी विजीगिषु वृत्तीची परीक्षा घेतली आणि जीजीआर 22 मध्ये दुर्मिळ सहनशक्ती धैर्य आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडवले. वर्ष 1968 मध्ये एकट्याने बोटीने जगप्रदक्षिणा करणारे पहिले नाविक, सर रॉबिन नॉक्स जॉन्सन यांच्या सन्मानार्थ जीजीआर या शर्यतीचे आयोजन करण्यात येते.

जीजीआर 22 मध्ये भाग घेण्यासाठी 16 जणांनी नोंदणी केली आणि स्पर्धेच्या नियमानुसार त्या सर्वांनी वर्ष 1968 मध्ये उपलब्ध असलेली साधने तसेच तंत्रज्ञान वापरुन एकट्याने जगप्रदक्षिणा पूर्ण करणे अपेक्षित होते. कमांडर टॉमी यांच्यासह केवळ तीन जण ही शर्यत पूर्ण करू शकले. उर्वरित स्पर्धकांना तांत्रिक अडचणी किंवा अपघातामुळे ही शर्यत अर्धवट सोडून द्यावी लागली.

भारतीय नौदलातर्फे आयोजित सागर परिक्रमेच्या पुढील शर्यतीत एकट्याने जगप्रदक्षिणा करण्यासाठी तयारी करत असलेल्या दोन महिला नौदल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य कमांडर अभिलाष टॉमी यांनी नुकतेच स्वीकारले आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content