Homeचिट चॅटकवी, पत्रकार गजानन...

कवी, पत्रकार गजानन तुपे सन्मानित!

सुजन फाऊंडेशन, सातारा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने ज्येष्ठ कवी, लेखक व पत्रकार गजानन तुपे यांना पारगाव, खंडाळा, जि. सातारा येथे नुकतेच  सन्मानित करण्यात आले.

विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंतांना “सुजन” फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी गौरविण्यात येते. जिजाऊ – सावित्री जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. सुजन फाऊंडेशन, ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्था आणि जनसेवा मंच, खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्त्ववान महिलांना जिजाऊ आणि सावित्री पुरस्कारांनी याठिकाणी सन्मानित करण्यात आले. तर स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार-२०२१ हा पुरस्कार कवी, लेखक आणि पत्रकार गजानन तुपे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष संपतराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राणा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची नरेंद्र पाटील, अभिनेत्री मेघना झुंजम, सामाजिक कार्यकर्त्या अमृता पठारे, सीमा लोकरे आणि दीपक शिर्के उपस्थित होते. या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन जनार्दन गाडे यांनी केले. सुजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अजितकुमार जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात महिलांचा फार मोठा सहभाग होता.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content