Homeमुंबई स्पेशलघर जाळणाऱ्या आंदोलकांविरूद्ध...

घर जाळणाऱ्या आंदोलकांविरूद्ध ३०७ कलमाखाली गुन्हे!

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी घरे जाळली त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली (कलम ३०७) गुन्हे दाखल केले जातील. कोणत्याही परिस्थितीत सरकार हिंसाचार खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

बीड जिल्ह्यात घरात माणसं असताना बाहेरून घर पेटवून देण्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचे सर्व व्हिडिओ मिळाले असून 50 ते 55 जणांना ओळखण्यात आले आहे. या सर्वांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत घरे जाळणे किंवा मालमत्ता जाळणे असे प्रकार पोलीस खपवून घेणार नाहीत. जिथे शांततेत आंदोलन चालू आहे तेथे पोलीस त्यांना विरोध करणार नाहीत. मात्र जिथे हिंसाचार होईल तेथे पोलीस कडक कारवाई करतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

काही लोक या आंदोलनाचा फायदा घेत हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडमध्ये काही हॉटेल, दवाखाने, प्रतिष्ठान पेटवण्याचा प्रयत्न झाला. ही कारवाई अत्यंत चुकीची आहे आणि याची गंभीर दखल गृह विभागाने तसेच पोलिसांनी घेतली आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनांमध्ये काही राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी आहेत. या कार्यकर्त्यांच्या सहभागाची खात्री पटल्यावर त्यांची नावे जाहीर केली जातील, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content