Homeन्यूज अँड व्ह्यूजआता नव्याने दुमदुमणार...

आता नव्याने दुमदुमणार भारतीय दलित पँथरची भिमगर्जना!

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय दलित पँथर पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यीक, पत्रकारांशी आणि निवडक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचारविनीमय केल्यानंतर आठवले यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

या बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडीत रिपब्लिकन पक्षाची भविष्यातील वाटचाल काय असेल यावर आज विचारमंथन करण्यात आले. त्यात रिपब्लिकन पक्षांशी संलग्न असणाऱ्या सामाजिक संघटनेची स्थापना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त झाले. ज्या दलित पँथरच्या चळवळीतून रामदास आठवलेंचे नेतृत्त्व उभे राहिले त्या भारतीय दलित पँथरची पुर्नस्थापना करावी अशी सूचना या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर झाली. त्यामुळे आगामी काळात रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर पुन्हा एकदा भिमगर्जना करेल आणि भारतीय दलित पँथरचे वादळ पुन्हा तरुणांमध्ये घोंगावताना दिसेल, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

1970च्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली. दलित पँथर राजा ढाले यांनी विसर्जित केल्यानंतर रामदास आठवले यांच्या पुढाकारात भारतीय दलित पॅंथरचे संगठन उभे राहिले. आणि ते देशभर भारतीय दलित पँथर रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वात वादळासारखे घोंगावत राहिले. दलितांच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रचंड मोठी आंदोलने केली. एक आक्रमक कृतीशील सामाजिक संघटन म्हणून भारतीय दलित पँथरने देशभरातील दलितांचा विश्वास संपादित केला. त्या विश्वासावर रामदास आठवले यांच्यातला पँथर भिमगर्जना करीत देशभर आणि जगभर यांचे नेतृत्त्व पोहोचले.

आता पुन्हा रामदास आठवले पँथरच्या आवेशात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भिमगर्जना करणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीच्या हाती भारतीय दलित पँथरचे क्रांतीकारी आक्रमक संघटन ते सोपवणार आहेत. आठवले यांच्यातला पँथर पुन्हा अन्याय-अत्याचारांवर झेप घेणार आहे. या बैठकीला विचारवंत साहित्यीक शरणकुमार लिंबाळे, एड. दिलीप काकडे, रिपाइंचे अविनाश महातेकर, आजचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, बाबुराव कदम, मिलींद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.  

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content