Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात...

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.४४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:-

रायगड- ५८.१०, बारामती– ५६.०७, उस्मानाबाद- ६०.९१, लातूर- ६०.१८, सोलापूर– ५७.६१, माढा– ६२.१७, सांगली- ६०.९५, सातारा- ६३.०५, रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५९.२३, कोल्हापूर- ७०.३५ आणि हातकणंगले- ६८.०७ टक्के. ही अंदाजी टक्केवारी असून अंतीम टक्केवारी साधारण ३ ते ४ टक्क्यांनी वाढलेली असेल, असे सूत्रांनी सांगितले.

मतदान

सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

काल सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी  ६.६४  टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ७.९१, सांगलीत ५.८१, बारामतीत ५.७७, हातकणंगलेमध्ये ७.५५, कोल्हापूरमध्ये ८.०४, माढात ४.९९, उस्मानाबादेत ५.७९, रायगडमध्ये ६.८४, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ८.१७, साताऱ्यात ७.०० तर सोलापूरमध्ये ५.९२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत सरासरी  १८.१८ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये २०.७४, सांगलीत १६.६१, बारामतीत १४.६४, हातकणंगलेमध्ये २०.७४, कोल्हापुरात २३.७७, माढामध्ये १५ .११, उस्मानाबादेत १७.०६, रायगडमध्ये १७.१८, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये २१.१९, साताऱ्यात १८.९४ तर सोलापूरमध्ये १५.६९ टक्के मतदान झाले.

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ३२.७१, सांगलीत २९.६५, बारामतीत २७.५५, हातकणंगलेत ३६.१७, कोल्हापूरमध्ये ३८.४२, माढामध्ये २६.६१, उस्मानाबादेत ३०.५४, रायगडमध्ये ३१.३४, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ३३.९१, साताऱ्यात ३२.७८ तर सोलापूरमध्ये २९.३२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ४४.४८, सांगलीत ४१.३०, बारामतीत ३४.९६, हातकणंगलेत ४९.९४, कोल्हापुरात ५१.५१, माढामध्ये ३९.११, उस्मानाबादमध्ये ४०.९२, रायगडमध्ये ४१.४३, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ४४.७३, साताऱ्यात ४३.८३ तर सोलापूरमध्ये ३९.५४ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. लातूरमध्ये ५५.३८, सांगलीत ५२.५६, बारामतीत ४५.६८, हातकणंगलेमध्ये ६२.१८, कोल्हापुरात ६३.७१, माढामध्ये ५०.००, उस्मानाबादेत ५२.७८, रायगडमध्ये ५०.३१, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ५३.७५, साताऱ्यात ५४.११ तर सोलापूरमध्ये ४९.१७ टक्के मतदान झाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content