Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात...

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.४४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:-

रायगड- ५८.१०, बारामती– ५६.०७, उस्मानाबाद- ६०.९१, लातूर- ६०.१८, सोलापूर– ५७.६१, माढा– ६२.१७, सांगली- ६०.९५, सातारा- ६३.०५, रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५९.२३, कोल्हापूर- ७०.३५ आणि हातकणंगले- ६८.०७ टक्के. ही अंदाजी टक्केवारी असून अंतीम टक्केवारी साधारण ३ ते ४ टक्क्यांनी वाढलेली असेल, असे सूत्रांनी सांगितले.

मतदान

सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

काल सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी  ६.६४  टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ७.९१, सांगलीत ५.८१, बारामतीत ५.७७, हातकणंगलेमध्ये ७.५५, कोल्हापूरमध्ये ८.०४, माढात ४.९९, उस्मानाबादेत ५.७९, रायगडमध्ये ६.८४, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ८.१७, साताऱ्यात ७.०० तर सोलापूरमध्ये ५.९२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत सरासरी  १८.१८ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये २०.७४, सांगलीत १६.६१, बारामतीत १४.६४, हातकणंगलेमध्ये २०.७४, कोल्हापुरात २३.७७, माढामध्ये १५ .११, उस्मानाबादेत १७.०६, रायगडमध्ये १७.१८, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये २१.१९, साताऱ्यात १८.९४ तर सोलापूरमध्ये १५.६९ टक्के मतदान झाले.

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ३२.७१, सांगलीत २९.६५, बारामतीत २७.५५, हातकणंगलेत ३६.१७, कोल्हापूरमध्ये ३८.४२, माढामध्ये २६.६१, उस्मानाबादेत ३०.५४, रायगडमध्ये ३१.३४, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ३३.९१, साताऱ्यात ३२.७८ तर सोलापूरमध्ये २९.३२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ४४.४८, सांगलीत ४१.३०, बारामतीत ३४.९६, हातकणंगलेत ४९.९४, कोल्हापुरात ५१.५१, माढामध्ये ३९.११, उस्मानाबादमध्ये ४०.९२, रायगडमध्ये ४१.४३, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ४४.७३, साताऱ्यात ४३.८३ तर सोलापूरमध्ये ३९.५४ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. लातूरमध्ये ५५.३८, सांगलीत ५२.५६, बारामतीत ४५.६८, हातकणंगलेमध्ये ६२.१८, कोल्हापुरात ६३.७१, माढामध्ये ५०.००, उस्मानाबादेत ५२.७८, रायगडमध्ये ५०.३१, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ५३.७५, साताऱ्यात ५४.११ तर सोलापूरमध्ये ४९.१७ टक्के मतदान झाले.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content