Homeएनसर्कलअमृत मोहिमेअंतर्गत "जल दिवाळी"...

अमृत मोहिमेअंतर्गत “जल दिवाळी” अभियान संपन्न!

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) अमृत (अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन,AMRUT) या मोहिमेअंतर्गत मंत्रालयाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (दीनदयाळ अंत्योदय योजना,NULM), यांच्या सहकार्याने “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया, या प्रगतीशील उपक्रम नुकताच ओदिशात संपन्न झाला.

जलप्रशासनात महिलांचा समावेश करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. यावेळी महिलांना त्या रहात असलेल्या शहरांमधील जल प्रक्रिया प्रकल्पांना (WTPs) भेटी देऊन जलशुद्धीकरण प्रक्रियेची प्राथमिक माहिती दिली गेली. नागरिकांना उत्तम दर्जाचे पाणी मिळेल याची खात्री देणाऱ्या  स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या महत्त्वाच्या प्रक्रियेची माहिती या भेटींमधून महिलांना दिली गेली. याव्यतिरिक्त, महिलांना पाणी गुणवत्ता चाचणीच्या प्रक्रियेची माहिती देखील मिळेल.पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये स्वमालकी आणि  स्वत्वाची भावना निर्माण करणे हे या मोहिमेचे प्रमुख आणि व्यापक उद्दिष्ट आहे.

भारतात 65,000 MLD पेक्षा जास्त जल प्रक्रिया क्षमता असलेले रचनात्मक आणि 55,000 MLD पेक्षा जास्त कार्यक्षम असलेले 3,000 पेक्षा जास्त जलशुद्धीकरण प्रक्रिया क्षमता प्रकल्प आहेत. या मोहिमेदरम्यान, महिला बचत गट (SHGs) 20,000 MLD पेक्षा जास्त (देशातील एकूण 35% पेक्षा जास्त) क्षमता असलेल्या 550 हून अधिक जलशुद्धीकरण प्रकल्पांना भेट देतील.

घरातील पाणी व्यवस्थापनात महिलांचा महत्वपूर्ण वाटा असतो. महिलांना जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांबद्दलचे ज्ञान देऊन त्यांचे सक्षमीकरण करून, घरांसाठी सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळवणे सुनिश्चित करण्यासाठी त्यांची क्षमता वाढवणे हे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुरुषांचे पारंपारिक वर्चस्व असलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये समावेशकता आणि विविधतेला प्रोत्साहन देऊन लिंगभाव समानतेच्या समस्यांचे निराकरण करणे आहे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

“स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया “हे अभियान”, “जल दिवाळी” या उपक्रमांच्या पहिला टप्प्यात सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील (प्रारुप आचारसंहितेतील 5 राज्ये वगळता) 15,000 पेक्षा जास्त स्वमदत गटातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.

देशभरात मोहिमेने निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये या पुढील बाबी समाविष्ट आहेत:

1.महिलांना जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणी गुणवत्ता चाचणी या सुविधांच्या कामकाजाची ओळख करून देणे‌

2.महिला बचत गटांच्या कार्याच्या समावेषकतेला आणि सहभागाला पुरस्कार आणि लेखांद्वारे प्रोत्साहन देणे.

3.अमृत (AMRUT) योजना आणि त्याचा पाण्याच्या पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम याविषयी महिलांना परिचित करून त्यांना शिक्षित करणे.

जलप्रक्रियेच्या, हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव, सर्वसमावेशकतेला चालना, स्वयंसहाय्यता गटांचे सक्षमीकरण, सकारात्मक समुदाय प्रभाव आणि भविष्यातील उपक्रमांचे प्रारुप याविषयी जागरूकता आणि ज्ञान वाढवणे यांचा समावेश या मोहिमेच्या यशस्वीततेच्या अपेक्षित उद्दिष्टांमध्ये होतो.

अमृत आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका विभागांतील राज्य आणि शहरांतील अधिकारी हे जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या या भेटींची व्यवस्था करतील. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने पाण्याच्या संदर्भातील मूलभूत सुविधांसाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये महिलांचा समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या या उपक्रमात सर्व राज्य आणि शहरातील अधिकार्‍यांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि समर्थन देण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे. 

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content