Homeएनसर्कलआयएनएस चिता, गुलदार...

आयएनएस चिता, गुलदार आणि कुंभीर 40 वर्षांनंतर कार्यमुक्त!

भारतीय नौदलाची चीता, गुलदार आणि कुंभीर या युद्धनौका 12 जानेवारी 2024 रोजी चार दशकांच्या गौरवशाली देशसेवेनंतर नौदलातून कार्यमुक्त करण्यात आल्या. पोर्ट ब्लेअर येथे पारंपरिक पद्धतीने कार्यमुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सूर्यास्ताच्या वेळी या तीनही जहाजांवरील राष्ट्रीय ध्वज, नौदल चिन्ह आणि तीन जहाजांचे डिकमिशनिंग प्रतिक शेवटच्या वेळी खाली उतरवण्यात आले.

चीता, गुलदार आणि कुंभीर ही जहाजे पोलंडच्या ग्डिनिया शिपयार्ड येथे पोलनोक्नी वर्ग जहाजे म्हणून बांधली गेली होती आणि ही जहाजे अनुक्रमे 1984, 1985 आणि 1986मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती. चित्ता हे जहाज आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अल्पा काळासाठी कोची आणि चेन्नई येथे तर कुंभीर आणि गुलदार हे विशाखापट्टणम येथे तैनात होते. या जहाजांनी नौदलात सूमारे 40 वर्षे सक्रिय सेवा बजावली. या जहाजांनी 12,300 दिवस समुद्र वास्तव्यात एकत्रितपणे सुमारे 17 लाख समुद्री मैलांचा प्रवास केला आहे. अंदमान आणि निकोबार कमांडचे उभयचर प्लॅटफॉर्म म्हणून, या जहाजांनी सैन्याच्या तुकड्या किनाऱ्यावर उतरवण्यासाठी 1300 पेक्षा अधिक समुद्रकिनारी मोहीमा केल्या आहेत.

आपल्या गौरवशाली सेवा काळात या जहाजांनी अनेक सागरी सुरक्षा मोहिमा आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण कार्यात भाग घेतला आहे. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची तस्करी तसेच भारत आणि श्रीलंकेच्या सीमेवरील अवैध स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मे 1990मध्ये ऑपरेशन ताशा दरम्यान भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या आयपीकेएफ मोहीमेचा भाग म्हणून ऑपरेशन अमन तसेच 1997 मध्ये श्रीलंकेवर चक्रीवादळामुळे कोसळलेले संकट आणि 2004मध्ये हिंदी महासागरातील त्सुनामी नंतरच्या मदत कार्यात या जहाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

चित्ता, गुलदार आणि कुंभीर या भारतीय नौदलाच्या जहाजांनी सागरी सेवा क्षेत्रात एक अमिट छाप उमटवली आहे आणि त्यांची कार्यमुक्ती झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय संपला आहे.

एअर मार्शल साजू बालकृष्णन, एव्हीएसएम, व्हीएम, अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN)चे कमांडर-इन-चीफ आणि व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम, व्हीएसएम यांच्यासह नौदल उपप्रमुख, ध्वज अधिकारी, माजी कमांडिंग अधिकारी आणि या तीनही जहाजांचा सेवादल ताफा पोर्ट ब्लेअर येथे संपन्न झालेल्या कार्यमुक्ती समारंभात सहभागी झाला होता. एकाच वर्गाच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी कार्यमुक्त करण्यात आल्याने हा कार्यक्रम खूप अनोखा बनला होता.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content