Homeकल्चर +'श्रीमद् रामायण’मध्ये लंकाधीश...

‘श्रीमद् रामायण’मध्ये लंकाधीश रावण बसतो शिव पूजेला

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या भव्यदिव्य मालिकेत भगवान श्रीराम (सुजय रेऊ) आणि लंकाधिपती रावण (निकितीन धीर) यांच्यातील युद्ध एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. कारण लक्ष्मणाने (बसंत भट्ट) इंद्रजीत (ऋषिराज पवार)चा वध केला आहे. आपल्या पुत्राचा अचेतन देह पाहून रावण उद्ध्वस्त झाला आहे आणि श्रीरामाविरुद्ध अंतिम युद्ध करण्यास तो सज्ज झाला आहे. युद्धावर जाण्यापूर्वी आपल्या मुलाच्या मृत्यूने पिसाटलेला रावण, श्रीरामावर विजय मिळवण्याच्या लालसेने आणखी शक्ती प्राप्त करण्यासाठी शिव पूजा आरंभतो.

दरम्यान, श्रीरामदेखील शक्ती उपासना करतात आणि महागौरीला आवाहन करतात. रावणाच्या ताकदीवर विजय मिळवण्यासाठी तिच्याकडून मार्गदर्शन आणि शक्तीचे वरदान मागतात. अशाप्रकारे सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील महासंग्रामाचे रणशिंग फुंकले आहे आणि दोन्ही पक्ष सुसज्ज आहेत.

सध्याच्या कथानकाबाबत श्रीरामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणतो की, “कथानकाने तीव्रतेची परिसीमा गाठली आहे. एकीकडे आपल्या पुत्राला गमावून शोकाकूल झालेला, बलशाली रावण श्रीरामाविरुद्ध लढण्यासाठी तयारी करत आहे. तर दुसरीकडे, सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी आतुर झालेले श्रीराम शक्ती पूजा करून नवीन सामर्थ्य मिळवत आहेत. या शेवटच्या अध्यायात राम आणि रावण दोघेही अंतिम लढाईसाठी सज्ज होत आहेत, दैवी पाठबळ मिळवत आहेत, तेव्हा प्रेक्षकांना विश्वास आणि सामर्थ्य यांची अंतिम कसोटी बघता येईल.

Continue reading

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...
Skip to content