Homeटॉप स्टोरीगतवर्षी भारतात झाले...

गतवर्षी भारतात झाले 4,61,312 रस्ते अपघात!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात-2022’ संबंधी वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, 2022 या वर्षात देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांत एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले आणि त्यामध्ये 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4,43,366 जण जखमी झाले. आधीच्या पंचांग वर्षातील आकडेवारीशी तुलना करता, या अहवालानुसार 2022 या वर्षी अपघातात 11.9%, मृत्युंमध्ये 9.4% तर जखमींच्या प्रमाणात 15.3% वाढ झाली आहे.

हा अहवाल आशिया पॅसिफिक रस्ते अपघातविषयक माहिती (एपीआरएडी) आधारित प्रकल्पांतर्गत संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने आशिया तसेच पॅसिफिक (युएनईएससीएपी) प्रदेशासाठी निर्धारित केलेल्या प्रमाणित स्वरुपात पंचांग वर्षात राज्ये तसेच केंद्रशासित प्रशासने यांच्या पोलीस विभागाकडून प्राप्त आकडेवारी/माहितीवर आधारित आहे.

या अपघातांना कारणीभूत असणाऱ्या, अतिवेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे तसेच वाहतूकविषयक नियमांचे पालन न करणे यांसह अनेक घटकांचे निरसन करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारण्याची तातडी अधोरेखित होत आहे. त्यासाठी आपण अंमलबजावणी यंत्रणा मजबूत करणे, चालकांचे शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रमाणात राबवणे तसेच रस्ते आणि वाहनांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे अशा उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सशक्त उपाययोजना राबवण्याप्रती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कटिबद्ध आहे. रस्त्यांचा वापर करणाऱ्यांची वर्तणूक, रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, वाहनांचे मापदंड, वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका अशा विविध पैलूंवर देखील मंत्रालय काम करत आहे. रस्ते अपघातांचे स्वरूप बहु-नैमित्तिक असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोघांच्याही अखत्यारीतील सर्व संस्थांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून अशा समस्या सोडवण्यासाठी बहु आयामी दृष्टीकोनाची गरज आहे. केंद्रीय मंत्रालयाने इतर विविध संबंधित संघटना तसेच भागधारक यांच्या सहकार्याने शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते तसेच वाहने अशा दोन्हींची), अंमलबजावणी तसेच आपत्कालीन सेवा या चार घटकांवर लक्ष केंद्रित करून  रस्ते सुरक्षेची समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी धोरण तयार केले आहे.

त्याशिवाय, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आधुनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते सुरक्षाविषयक लेखापरीक्षण आणि या विषयासंदर्भात जगात प्रचलित सर्वोत्तम पद्धती शिकण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सहयोगी संबंधांची स्थापना यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी वास्तव वेळात माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अपघातविषयक तपशीलवार इलेक्ट्रॉनिक अहवाल (ई-डीएआर) आणि स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांची उभारणी यांसारखे उपक्रमदेखील हाती घेण्यात येत आहेत.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content