Homeटॉप स्टोरीगतवर्षी भारतात झाले...

गतवर्षी भारतात झाले 4,61,312 रस्ते अपघात!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात-2022’ संबंधी वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, 2022 या वर्षात देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांत एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले आणि त्यामध्ये 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4,43,366 जण जखमी झाले. आधीच्या पंचांग वर्षातील आकडेवारीशी तुलना करता, या अहवालानुसार 2022 या वर्षी अपघातात 11.9%, मृत्युंमध्ये 9.4% तर जखमींच्या प्रमाणात 15.3% वाढ झाली आहे.

हा अहवाल आशिया पॅसिफिक रस्ते अपघातविषयक माहिती (एपीआरएडी) आधारित प्रकल्पांतर्गत संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने आशिया तसेच पॅसिफिक (युएनईएससीएपी) प्रदेशासाठी निर्धारित केलेल्या प्रमाणित स्वरुपात पंचांग वर्षात राज्ये तसेच केंद्रशासित प्रशासने यांच्या पोलीस विभागाकडून प्राप्त आकडेवारी/माहितीवर आधारित आहे.

या अपघातांना कारणीभूत असणाऱ्या, अतिवेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे तसेच वाहतूकविषयक नियमांचे पालन न करणे यांसह अनेक घटकांचे निरसन करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारण्याची तातडी अधोरेखित होत आहे. त्यासाठी आपण अंमलबजावणी यंत्रणा मजबूत करणे, चालकांचे शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रमाणात राबवणे तसेच रस्ते आणि वाहनांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे अशा उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सशक्त उपाययोजना राबवण्याप्रती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कटिबद्ध आहे. रस्त्यांचा वापर करणाऱ्यांची वर्तणूक, रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, वाहनांचे मापदंड, वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका अशा विविध पैलूंवर देखील मंत्रालय काम करत आहे. रस्ते अपघातांचे स्वरूप बहु-नैमित्तिक असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोघांच्याही अखत्यारीतील सर्व संस्थांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून अशा समस्या सोडवण्यासाठी बहु आयामी दृष्टीकोनाची गरज आहे. केंद्रीय मंत्रालयाने इतर विविध संबंधित संघटना तसेच भागधारक यांच्या सहकार्याने शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते तसेच वाहने अशा दोन्हींची), अंमलबजावणी तसेच आपत्कालीन सेवा या चार घटकांवर लक्ष केंद्रित करून  रस्ते सुरक्षेची समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी धोरण तयार केले आहे.

त्याशिवाय, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आधुनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते सुरक्षाविषयक लेखापरीक्षण आणि या विषयासंदर्भात जगात प्रचलित सर्वोत्तम पद्धती शिकण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सहयोगी संबंधांची स्थापना यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी वास्तव वेळात माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अपघातविषयक तपशीलवार इलेक्ट्रॉनिक अहवाल (ई-डीएआर) आणि स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांची उभारणी यांसारखे उपक्रमदेखील हाती घेण्यात येत आहेत.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content