Homeकल्चर +गुलमोहरः एक हृदय...

गुलमोहरः एक हृदय पिळवटून टाकणारा कौटुंबिक चित्रपट!

गोवा येथे आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय पॅनोरमा’ विभागामध्ये राहुल व्ही. चित्तेला लिखित, दिग्दर्शित ‘गुलमोहोर’ हा चित्रपट सादर झाला. हा चित्रपट, बात्रा कुटुंबातील विविध सदस्यांच्या वैयक्तिक कथांच्या गुंफणीतून कुटुंब आणि घर यांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो.

यानिमित्ताने पत्र सूचना कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना, ‘गुलमोहोर’ या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे अभिनेते मनोज बाजपेयी म्हणाले की दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर निर्माण केलेले घरगुती वातावरण ‘कुटुंब’ या विषयावर आधारित हृदयस्पर्शी चित्रपटाचे चित्रीकरण करताना एखाद्या कार्यशाळेसारखे उपयुक्त ठरले. कुटुंब ही संकल्पना आणि त्यातील भावना चित्रीकरणाच्या पल्याड पोहोचली होती. कॅमेऱ्यासमोर आम्ही वडील, मुलगा, मुलगी, आई अशी पात्रे रंगवत होतो आणि चित्रीकरण संपल्यानंतर आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकत्र येऊन आपापल्या कल्पना, हास्य आणि जेवण यांचीही देवाण-घेवाण करत होतो. या वातावरणाने सर्व तरुण कलाकारांना आपापल्या भूमिकेत शिरण्यास आणि त्या भूमिकेचे बारकावे समजून घेण्यास मदत केली. एक कुटुंब, त्यातील सदस्य आणि त्यांचे आपापसांतील नातेसंबंध हा चित्रपट दर्शवतो. या घरगुती वातावरणाशिवाय हे शक्य झाले नसते, असे बाजपेयी म्हणाले. 

रंगभूमीकडून चित्रपटांच्या दिशेने झालेल्या स्थित्यंतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज बाजपेयी म्हणाले की ते सर्वप्रथम स्वतःला रंगभूमीवरील कलाकार मानतात. ‘बँडीट क्वीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी, भविष्यात रंगभूमीवरील कलाकारांना आर्थिक अडचणींमुळे ज्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकेल अशा समस्या अधोरेखित केल्या आणि आपल्याला चित्रपटांचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. “रंगभूमी हे अभिनेत्याचे माध्यम आहे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे”, अशा शब्दात रंगभूमीचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, मी जेव्हा एखाद्या चित्रपटाचा भाग असतो तेव्हा त्यातील माझ्या कामगिरीचे श्रेय घेणे मला कठीण जाते कारण आत खोलवर कुठेतरी मला हे ठाऊक असते की हे काम दिग्दर्शकाच्या कल्पनेतून साकार झालेले आहे.

‘गुलमोहोर’ या कौटुंबिक चित्रपटामागची संकल्पना विषद करताना चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चित्तेला यांनी सांगितले की कुटुंब आणि घर यांच्या व्याख्या काळासोबत बदलत जातात आणि आपले वय झाले की त्या बदलतात. मात्र याच दोन गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या असतात. “हा चित्रपट तीन पिढ्यांच्या संदर्भात कुटुंब आणि घर यांच्या अर्थाबद्दल भाष्य करतो. ‘गुलमोहोर’ या शीर्षकाबद्दल माध्यम प्रतिनिधींना अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘गुलमोहोर’ हा काव्यात्मक शब्द आहे आणि तो मला गुलजार यांच्या अर्थवाही गाण्यांची आठवण करून देतो. गुलमोहोराची फुले पटकन उमलतात आणि पटकन गळूनही पडतात आणि त्यांची प्रतिमा, मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असलेल्या कथेशी चपखल जुळते. हा चित्रपट दिल्लीमध्ये चित्रित केला आहे आणि दिल्ली शहर हे या चित्रपटातील एका पात्राप्रमाणे आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content