Homeबॅक पेज'दिल्ली' आणि 'शक्ती'...

‘दिल्ली’ आणि ‘शक्ती’ पोहोचल्या मलेशियाच्या कोटा किनाबालूला!

भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल  राजेश धनखड यांच्या नेतृत्त्वाखाली दोन जहाजे, दिल्ली आणि शक्ती, मलेशियाच्या कोटा किनाबालू इथे पोहोचली आहेत.

मलेशिया नौदल (रॉयल मलेशियन नेव्ही) आणि मलेशियातील भारतीय उच्चायुक्तांनी जहाजांचे स्वागत केले. या जहाजांच्या या बंदरातील मुक्कामादरम्यान, भारतीय आणि मलेशियाच्या नौदलाचे कर्मचारी, तसेच विषय सामग्रीतज्ज्ञ योग, क्रीडा स्पर्धा आणि क्रॉस-डेक या एकमेकांच्या जहाजांना भेटी यासह विविध व्यावसायिक गाठीभेटींचे आदानप्रदान करतील. याचा उद्देश दोन नौदलांमध्ये असलेले विद्यमान परस्पर सहकार्य आणि सामंजस्य अधिक मजबूत करणे हा आहे.

भारतीय नौदलाची जहाजे बंदराची भेट पूर्ण झाल्यावर, मलेशिया नौदलाच्या जहाजांसह समुद्रात सागरी भागीदारी सरावामध्येही सहभागी होतील. नुकत्याच संपलेल्या मिलान आणि एक्स समुद्रा लक्ष्मणा, या दोन उपक्रमांमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे, दोन नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. या भेटीमुळे दोन सागरी शेजारी देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य, विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणखी दृढ होईल.

या महत्त्वाच्या प्रदेशात भारतीय नौदलाच्या जहाजांची तैनाती, भारतीय नौदलाच्या ‘ॲक्ट ईस्ट’ अर्थात पूर्वेकडील देशांना प्राधान्य आणि भारत सरकारची सागर धोरणांप्रती दृढ वचनबद्धता अधोरेखित करते. आय एन एस दिल्ली, ही पहिली स्वदेशी रचनेची आणि बांधणीची प्रोजेक्ट-15 श्रेणीतील गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर म्हणजेच पथनिर्धारीत क्षेपणास्त्र विनाशिका आहे आणि आय एन एस शक्ती हे फ्लीट सपोर्ट म्हणजे ताफ्यातील पाठबळ पुरवणारे जहाज आहे. दोन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचा म्हणजे पूर्व ताफ्याचा भाग आहेत.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content