Homeबॅक पेज'दिल्ली' आणि 'शक्ती'...

‘दिल्ली’ आणि ‘शक्ती’ पोहोचल्या मलेशियाच्या कोटा किनाबालूला!

भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल  राजेश धनखड यांच्या नेतृत्त्वाखाली दोन जहाजे, दिल्ली आणि शक्ती, मलेशियाच्या कोटा किनाबालू इथे पोहोचली आहेत.

मलेशिया नौदल (रॉयल मलेशियन नेव्ही) आणि मलेशियातील भारतीय उच्चायुक्तांनी जहाजांचे स्वागत केले. या जहाजांच्या या बंदरातील मुक्कामादरम्यान, भारतीय आणि मलेशियाच्या नौदलाचे कर्मचारी, तसेच विषय सामग्रीतज्ज्ञ योग, क्रीडा स्पर्धा आणि क्रॉस-डेक या एकमेकांच्या जहाजांना भेटी यासह विविध व्यावसायिक गाठीभेटींचे आदानप्रदान करतील. याचा उद्देश दोन नौदलांमध्ये असलेले विद्यमान परस्पर सहकार्य आणि सामंजस्य अधिक मजबूत करणे हा आहे.

भारतीय नौदलाची जहाजे बंदराची भेट पूर्ण झाल्यावर, मलेशिया नौदलाच्या जहाजांसह समुद्रात सागरी भागीदारी सरावामध्येही सहभागी होतील. नुकत्याच संपलेल्या मिलान आणि एक्स समुद्रा लक्ष्मणा, या दोन उपक्रमांमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे, दोन नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. या भेटीमुळे दोन सागरी शेजारी देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य, विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणखी दृढ होईल.

या महत्त्वाच्या प्रदेशात भारतीय नौदलाच्या जहाजांची तैनाती, भारतीय नौदलाच्या ‘ॲक्ट ईस्ट’ अर्थात पूर्वेकडील देशांना प्राधान्य आणि भारत सरकारची सागर धोरणांप्रती दृढ वचनबद्धता अधोरेखित करते. आय एन एस दिल्ली, ही पहिली स्वदेशी रचनेची आणि बांधणीची प्रोजेक्ट-15 श्रेणीतील गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर म्हणजेच पथनिर्धारीत क्षेपणास्त्र विनाशिका आहे आणि आय एन एस शक्ती हे फ्लीट सपोर्ट म्हणजे ताफ्यातील पाठबळ पुरवणारे जहाज आहे. दोन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचा म्हणजे पूर्व ताफ्याचा भाग आहेत.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content