Homeचिट चॅटजहाजबांधणीच्या पोलादासाठी तटरक्षक...

जहाजबांधणीच्या पोलादासाठी तटरक्षक दलाने केला सामंजस्य करार

जहाजबांधणीत स्वदेशी भागांच्या वापराला चालना देण्याचा भाग म्हणून देशी बनावटीचे सागरी वापराच्या दर्जाचे पोलाद घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि जिंदाल स्टील अँड पॉवर यांच्यादरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

देशहितासाठी करारातील दोन्ही भागीदार स्वदेशीचा वापर वाढवण्यासाठी आवश्यक क्षमताबांधणीसाठी वचनबद्ध राहणार आहेत. देशाच्या संरक्षणाशी संबंधित क्लिष्ट आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक–खाजगी भागीदारीचे महत्त्व या सामंजस्य कराराने अधोरेखित केले आहे. सरकारी विभाग आणि खाजगी क्षेत्राने एकत्र येण्याची गरज या कराराच्या निमित्ताने समोर आली आहे. दर्जा, श्रेणी, परिमाणे यांसह जहाजबांधणीसाठी वेळोवेळी आवश्यक ठराविक प्रकारच्या पोलादाचा पुरवठा करण्यासाठी निर्दिष्ट पोलादनिर्मिती प्रकल्पांचा या करारात समावेश केला आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे उपसंचालक (साहित्य व देखभाल), महानिरीक्षक एच. के. शर्मा, जिंदाल स्टील अँड पॉवरचे मुख्य विपणन अधिकारी एस. के. प्रधान यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content