Homeब्लॅक अँड व्हाईटजम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीचे...

जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीचे पाणी आले वळवण्यात!

किश्तवार जिल्ह्यातील द्राबशल्ला येथे 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता चिनाब नदीला बोगद्यातून वळवून जम्मू आणि काश्मीरमधील 850 मेगावॅटच्या रटल जलविद्युत प्रकल्पाने एक मोठा टप्पा गाठला आहे. नदीचा प्रवाह वळवल्यामुळे उत्खनन आणि धरणाचे बांधकाम सुरू करण्यासाठी नदीच्या पात्रातील धरणक्षेत्र वेगळे करणे शक्य होईल. यामुळे प्रकल्पाच्या बांधकामाला गती येईल आणि संभाव्य विलंब कमी झाल्यामुळे मे 2026च्या नियोजित कार्यान्वित तारखेची पूर्तता करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न फलद्रुप होतील.

नदीप्रवाह वळवण्याच्या या समारंभाचे उद्घाटन नॅशनल हाइड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशनचे (एनएचपीसी) मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. के. विश्नोई यांच्या हस्ते आणि जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव एच. राजेश प्रसाद; आर एच पी सी एल चे व्यवस्थापकीय संचालक आय. डी. दयाल, जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ लिमिटेड (जेकेएसपीडीसी) चे संचालक पंकज मंगोत्रा,  एन एच पी सीचे संचालक आर एचपीसीएलचे  मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. नौरियाल आणि एनएचपीसीचे आणि जम्मू काश्मीर सरकारचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.

रटल जलविद्युत प्रकल्प हा रटल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (RHPCL) द्वारे कार्यान्वित केला जात असून तो नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (एनएचपीसी) आणि जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ लिमिटेड (जेकेएसपीडीसी) यांच्यात अनुक्रमे 51% आणि 49% भागीदारीसह स्थापन केला जात आहे. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर 850 मेगावॅटची स्थापित क्षमता असलेला रटल जलविद्युत प्रकल्प आहे. भारत सरकारच्या एकूण 5281.94 कोटी रुपये गुंतवणूकीच्या या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने जानेवारी 2021मध्ये मंजुरी दिली.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content