Homeचिट चॅट११ ऑगस्टला बीओबी...

११ ऑगस्टला बीओबी कप बुद्धिबळ स्पर्धा   

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स एकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षांखालील मुला-मुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्टला आरएमएमएस सभागृह, परळ, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात येणार आहे.

आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना  सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागाच्या सौजन्याने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक वयोगटात  किमान चार साखळी फेऱ्यांमधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. प्रत्येक वयोगटातील पहिल्या १० मुलांना व पहिल्या ५ मुलींना बीओबी कपचा पुरस्कार दिला जाईल. सर्व सामने जिंकणाऱ्या लहान वयोगटातील विजेत्यास क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयडियल स्पोर्ट्स एकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.

संयोजकांतर्फे बुद्धिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटसअॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याशी ७ ऑगस्टपर्यंत संर्पक‌ साधावा.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content