Homeडेली पल्सराज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये...

राज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी कक्ष!

राज्यातील ड्रग तस्करीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीसठाण्यांत अंमली पदार्थविरोधी कक्षाची स्थापना करून एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. आजवर राज्यात पन्नास हजार कोटी रुपयांहून जास्त किंमतीचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात चेतन तुपे, सुनील कांबळे, रोहित पवार, विश्वजीत कदम यांच्यासह अनेक सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ललित पाटील याला ससून रुग्णालयात इतके दिवस कोणाच्या आशीर्वादाने ठेवण्यात आले, अशी विचारणाही या सदस्यांनी केली होती.

त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, ललित पाटीलला पकडल्यानंतर त्याची साधी पीसी म्हणजे पोलीस कोठडीही घेण्यात आली नव्हती. तेव्हा २ एप्रिल २०२१ला पिंपरीचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ३ पानी पत्र राज्य सरकारला लिहिले. त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून ललित पाटीलची पोलीस कोठडी मिळण्यासाठी परवानगी मागितली होती. पण, ती दिली गेली नाही. ललित पाटील हे उद्धवजींच्या शिनसेनेचे शहरप्रमुख होते. तरीही रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील आरोपीला इतके दिवस ठेवले गेले असेल तर ते चूकच आहे. पण, या विषयावर आम्हाला राजकारण करायचे नाही.

अंमली

ज्यांनी हे दबावाखाली केले त्यांच्यावरही कारवाई करा, ही मागणी अनिल देशमुख यांनी केली. त्यावर कारवाई केली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आजवर पन्नास हजार कोटींवरहून अधिक किंमतीची ड्रग्स पकडण्यात आली आहेत. ललित पाटील प्रकरणात आजवर कोणताही राजकीय सहभाग आढळून आला नाही. याप्रकरणी संबंध असलेल्या चार पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, असं ही फडणवीस यांनी सांगितलं.

ठाण्यात पेमेंट गेटवे फसवणूक प्रकरणात सोळा हजार कोटींचा व्यवहार झाला असल्यामुळे त्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे व्यवहार राष्ट्रीय स्तरावरही असून गरज पडल्यास केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी तीन महिन्यांत तपासाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल असंही फडणवीस म्हणाले. मूळ प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. आशिष शेलार, रवींद्र वायकर, तमिळ सेल्वन यांनी उपप्रश्न विचारले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content