Homeएनसर्कलकपिल पाटील आज...

कपिल पाटील आज करणार ‘निरोगी गावे..’ कार्यशाळेचे उद्घाटन!

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज, 18 जानेवारीला आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे ‘आरोग्यसंपन्न भविष्याच्या दिशेने निरोगी गावे’, या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन होईल.

पंचायती राज मंत्रालय (एमओपीआर) आंध्र प्रदेश सरकारच्या पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभागाच्या निकट सहकार्याने 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान संकल्पना 2: निरोगी गाव हा संकल्पनात्मक दृष्टिकोन स्वीकारून ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण या विषयावर या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे.

चांगल्या सवयी; आरोग्याच्या मापदंडांवर देखरेख ठेवण्यासाठी पंचायतींची भूमिका, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी) मध्ये ग्राम आरोग्य योजनेचे एकात्मीकरण, अनुकरणीय धोरणे, दृष्टिकोन, आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे प्रदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असेल.

ही कार्यशाळा सहकार्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि निकोप भविष्याच्या उभारणीकरिता धोरण आखण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदान करते. शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण (एलएसडीजी) चे उद्दिष्ट जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी)चे स्थानिकीकरण करणे आणि तळागाळातील विशिष्ट आव्हाने आणि संधींना सामोरे जाणे हे आहे. एलएसडीजी ची संकल्पना 2 म्हणजेच निरोगी गाव ही आरोग्य आणि कल्याणावर भर देणाऱ्या खेड्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते.

संकल्पना 2: निरोगी गाव या प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित झालेल्या पंचायतींनाही तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content