३ व ४ मेला अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धा

येत्या ३ व ४ मे रोजी, सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत सुविद्या डिग्री कॉलेज, योजना‌ शाळा पटांगण, मागाठाणे बस डेपोजवळ, बोरीवली पूर्व, मुंबई याठिकाणी मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांबातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांना समर्पित “अजिंक्यतारा चषक – चतुर्थ वर्ष” मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरातील ४० संस्थांमधून अंदाजे ७०० खेळाडू यात सहभागी होणार आहेत. ६/८/१०/१२/१४/१६/१८ वर्षांखालील मुले आणि मुली असे खेळाडूंचे वयोगट आहेत. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मल्लखांब खेळातील पॅरा मल्लखांब वयोगटातील स्पर्धा घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूस अजिंक्यतारा पदक, सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येईल तसेच प्रत्येक वयोगटात वैयक्तिक पदकं, सांघिक चषक अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरातील नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि भविष्यात यातूनच अनेक पुरस्कारविजेते खेळाडू घडावेत हा स्पर्धा आयोजनाचा हेतू आहे. सुविद्या प्रसारक संघाचे सचिव मिलिंद जोशी, स्पर्धा सचिव संचिता देवल आणि स्पर्धाप्रमुख आशिष देवल व दुदम सरांचे विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही स्पर्धा पार पडणार आहे.

आधिक माहितीसाठी संपर्क- आशिष देवल (९६६४००२०५१)

1 COMMENT

  1. एक त्रुटी मात्र पाहायला मिळाली
    ज्याना तुम्ही पंच म्हणुन नियुक्त केलेत त्यांनी नवोदित खेळाडूंना दिलेल्या वागणुकीची मला कीव येते
    स्पर्धा 12 वर्षाखालील मुले
    1)स्पर्धक चुकला की काही पंचांच्या चेहर्‍यावर हास्य उमटण्याची कृती

    2)स्पर्धा संपल्यावर फक्त त्यांना आवडलेला स्पर्धक याला हस्तांदोलन करण

    तर जे स्पर्धक चांगलं perform नाही करू शकले त्या स्पर्धकांना हस्तांदोलन न करणे
    स्पर्धक पहिल्यांदा perform करत आहे हे नक्की यांना कळत नव्हते का?एक खेळाडू पंचा कडे हात पुढे केला पण पंचांनी त्याकडे दुर्लक्ष करून दुसर्‍या खेळाडूचे कौतुक करताना पाहायला मिळाले असे साधारणपणे 6 वेळा घडले कदाचित चष्मा घरी विसरून आले त की काय असे वाटले पण ज्याने चष्मा लावलेला तो पंच ही तसाच निघाला

    3)नवोदित स्पर्धकांना मिळालेली पंचांकडुन वागणूक मनाला चटका देऊन गेली

    खूपच छान नियोजन आज बर्‍याच वर्षानी पाहायला मिळाले आयोजक व स्पर्धक यांचा उत्साह मनाला भावला
    पुनश्च एकदा अभिनंदन व धन्यवाद
    असे उपक्रम पुन्हा पुन्हा आपण आयोजित करावेत या करीता शुभेच्छा

Comments are closed.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content