Homeटॉप स्टोरीलोकसभा निवडणुका पाहण्यासाठी...

लोकसभा निवडणुका पाहण्यासाठी २३ देशांतले ७५ प्रतिनिधी भारतात!

देशातल्या लोकसभा निवडणुकांचे साक्षीदार होण्यासाठी जगातल्या २३ देशांचे ७५ प्रतिनिधी सध्या भारतात आले असून महाराष्ट्रासह सहा राज्यांतल्या मतदानाची प्रक्रिया अनुभवणार आहेत.

निवडणूकविषयक एकात्मता आणि पारदर्शकतेचे निदर्शक म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात सर्वोच्च मापदंड धारण करणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे आयोजन करण्याप्रती कटिबद्धतेचे उदाहरण घालून देत या लोकशाही उत्कृष्टतेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांसाठी (ईएमबीज) ही संधी दिली आहे. सहभागाचे प्रमाण आणि आवाका यांच्या संदर्भात अशा

पद्धतीचा हा पहिलाच कार्यक्रम असून यामध्ये भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किरगीझ रिपब्लिक, रशिया, मोल्दोवा, ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलिपाईन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकिस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालदीव्ज, पापुआ न्यू गिनी आणि

लोकसभा

नामिबिया अशा २३ देशांमध्ये कार्यरत ईएमबीज तसेच संबंधित संस्थांचे ७५ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. निवडणूक यंत्रणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानाचे (आयएफईएस) सदस्य तसेच भूतान आणि इस्रायल या देशांतील माध्यमांचे प्रतिनिधीदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

कालपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात परदेशातील जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या (ईएमबीज) प्रतिनिधींना भारतीय निवडणूक यंत्रणेतील बारकावे तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतर्फे अंमलात आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींविषयी अवगत करण्यात येईल. आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू कार्यक्रमात उपस्थित प्रतिनिधींना संबोधित करतील. त्यानंतर हे प्रतिनिधी लहानलहान गटांमध्ये विभागून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांना भेटी देण्यासाठी निघतील. हे सर्वजण तेथील निवडणूक प्रक्रिया आणि विविध मतदारसंघांमध्ये संबंधित तयारीचे निरीक्षण करतील. ९ मे रोजी या कार्यक्रमाचा समारोप होईल.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content