Homeब्लॅक अँड व्हाईटगेल्या वर्षी 'भारत...

गेल्या वर्षी ‘भारत गौरव’ ट्रेनच्या झाल्या 172 फेऱ्या!

भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव’ पर्यटक गाड्यां अंतर्गत संकल्पना-आधारित मार्गांवर पर्यटक गाड्या चालवण्याची संकल्पना मांडली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे प्रदर्शित करणे हा या संकल्पना आधारित पर्यटक मार्ग गाड्यांचा उद्देश आहे. गेल्या वर्षी, 2023मध्ये, 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या देशभरातील विविध पर्यटनस्थळांवरून 96,491 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या भारत गौरव गाड्यांच्या एकूण 172 फेऱ्या चालवण्यात आल्या. या गाड्यांनी श्री राम-जानकी यात्रा, अयोध्या ते जनकपूर, श्री जगन्नाथ यात्रा, “गरवी गुजरात” सहल, आंबेडकर सहल, ईशान्य सहल यासारख्या प्रमुख पर्यटनक्षेत्रांचा प्रवास केला आहे.

या गाड्यांमधील प्रवास खर्च सर्वसमावेशक सहल पॅकेजेसच्या स्वरूपात दिला जातो. यात आरामदायी रेल्वे प्रवास आणि संबंधित सेवांसह ऑफ-बोर्ड प्रवास आणि बसमधून स्थलदर्शन, हॉटेलमध्ये राहणे, सहल मार्गदर्शक, जेवण, प्रवास विमा इत्यादी सेवा पुरवल्या जातात.

भारत गौरव रेल्वेगाडी योजनेंतर्गत उत्तम दर्जाच्या डब्यांसह रेल्वे आधारित पर्यटनाच्या तरतुदीद्वारे देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केन्द्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांच्या अनुषंगानेही हे पाऊल उचलले आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या- https://www.irctctourism.com/bharatgaurav.

Continue reading

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...
Skip to content