Homeन्यूज अँड व्ह्यूज.. म्हणे एसटीच्या...

.. म्हणे एसटीच्या आगारे एअरपोर्टच्या लाऊंजसारखी करणार!

महाराष्ट्राच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हाती आल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी सेवा सुधारण्याबात अनेक घोषणा करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यांच्या ‘विमान’सेवेचे प्रेम लक्षात घेता अनेक एसटी बसेसची आगारे आम्ही विमानतळासारखी चकाचक करू अशीही त्यांनी घोषणा केली आहे. त्यांच्याच शब्द वापरायचा झाल्यास एसटी डेपो ‘लाऊंज’सारखी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात चुकीचे काही आहे असे वाटतं नाही. परंतु एसटीची विविध ठिकाणी असलेली आगारे किंवा एसटीच्या कार्यशाळांची सध्याची परिस्थिती पाहता परिवहन मंत्र्यांच्या घोषणा व सद्यस्थिती यात जमीनअस्मानाचे अंतर आहे.

उदाहरणादाखल त्यांच्याच ठाणे शहरातील खोपट एसटी आगाराचे देता येईल. या एसटी आगाराच्या दरवाजातून आत जाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. कारण, तेथे दिवसाचे चोवीस तास कुणाच्या ना कुणाच्यातरी खासगी मोटारगाडया पार्क केलेल्या असतातच. अधिकाऱ्यांच्या गाड्या कार्यालय आवारात सुलभरीतीने नेता याव्यात म्हूणन तेथे स्लोपही तयार केलेला आहे. ते

तर एक वेळ बाजूला ठेवू. या आगाराच्या पायऱ्यांवर नेहमीच कुणी भिकारी, कुणी गर्दुल्ला बसलेला दिसेलच. रात्री नऊ वाजल्यानंतर तर तेथे समाजकंटाकांचा अड्डाच असतो.. याच आगाराच्या मागील बाजूस नामदेव वाडीत एसटीची मोठी कार्यशाळाही आहे. तिची तर दुर्दशा पाहवत नाही. तेथे एसटीची एक ‘अश्वमेध’ गाडी चक्क दहा वर्षे ‘रुतून’ आहे. हे जणू सध्या एसटीचे प्रतीकच बनून राहिले आहे की काय असे वाटते!

‘गाळात रुतलेली’ एसटी.. कर्मचाऱ्यांच्या प्रसाधनगृहाचे तर दशावतार झाले आहेत. कामगारांना हातपाय धुवायलाही नीट जागा नाही तर नैसर्गिक विधींसाठीतरी योग्य जागा कशी मिळेल, असा प्रतिसवाल एका कामगारांने केला. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी सरकारी लवाजमा न घेता खाजगी पाहणी दौरा करावा, असे आमचे आवाहन आहे. तशीच पाहणी ठाणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात (प) असलेल्या एसटी आगाराचीही केली जावी. तेथील खंडहर बनलेल्या इमारतीकडे कुणाचेच लक्ष नाही. गरीब बिचाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरही कसलेच छपर नाही. हे आधी तयार करा आणि मग ‘लाऊंज’च्या गप्पा मारा!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...
Skip to content