Skip to content
Homeन्यूज अँड व्ह्यूज.. म्हणे एसटीच्या...

.. म्हणे एसटीच्या आगारे एअरपोर्टच्या लाऊंजसारखी करणार!

महाराष्ट्राच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हाती आल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी सेवा सुधारण्याबात अनेक घोषणा करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यांच्या ‘विमान’सेवेचे प्रेम लक्षात घेता अनेक एसटी बसेसची आगारे आम्ही विमानतळासारखी चकाचक करू अशीही त्यांनी घोषणा केली आहे. त्यांच्याच शब्द वापरायचा झाल्यास एसटी डेपो ‘लाऊंज’सारखी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात चुकीचे काही आहे असे वाटतं नाही. परंतु एसटीची विविध ठिकाणी असलेली आगारे किंवा एसटीच्या कार्यशाळांची सध्याची परिस्थिती पाहता परिवहन मंत्र्यांच्या घोषणा व सद्यस्थिती यात जमीनअस्मानाचे अंतर आहे.

उदाहरणादाखल त्यांच्याच ठाणे शहरातील खोपट एसटी आगाराचे देता येईल. या एसटी आगाराच्या दरवाजातून आत जाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. कारण, तेथे दिवसाचे चोवीस तास कुणाच्या ना कुणाच्यातरी खासगी मोटारगाडया पार्क केलेल्या असतातच. अधिकाऱ्यांच्या गाड्या कार्यालय आवारात सुलभरीतीने नेता याव्यात म्हूणन तेथे स्लोपही तयार केलेला आहे. ते

तर एक वेळ बाजूला ठेवू. या आगाराच्या पायऱ्यांवर नेहमीच कुणी भिकारी, कुणी गर्दुल्ला बसलेला दिसेलच. रात्री नऊ वाजल्यानंतर तर तेथे समाजकंटाकांचा अड्डाच असतो.. याच आगाराच्या मागील बाजूस नामदेव वाडीत एसटीची मोठी कार्यशाळाही आहे. तिची तर दुर्दशा पाहवत नाही. तेथे एसटीची एक ‘अश्वमेध’ गाडी चक्क दहा वर्षे ‘रुतून’ आहे. हे जणू सध्या एसटीचे प्रतीकच बनून राहिले आहे की काय असे वाटते!

‘गाळात रुतलेली’ एसटी.. कर्मचाऱ्यांच्या प्रसाधनगृहाचे तर दशावतार झाले आहेत. कामगारांना हातपाय धुवायलाही नीट जागा नाही तर नैसर्गिक विधींसाठीतरी योग्य जागा कशी मिळेल, असा प्रतिसवाल एका कामगारांने केला. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी सरकारी लवाजमा न घेता खाजगी पाहणी दौरा करावा, असे आमचे आवाहन आहे. तशीच पाहणी ठाणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात (प) असलेल्या एसटी आगाराचीही केली जावी. तेथील खंडहर बनलेल्या इमारतीकडे कुणाचेच लक्ष नाही. गरीब बिचाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरही कसलेच छपर नाही. हे आधी तयार करा आणि मग ‘लाऊंज’च्या गप्पा मारा!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

‘राडा’ संस्कृतीवरचा मुख्यमंत्र्यांचा उतारा होईल का पुरेसा?

कालच्या गुरुवारी राज्य विधिमंडळ परिसरात व नंतर विधिमंडळाच्या लॉबीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट तसेच हाणामारी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आमदारांचे 'कान' टोचावेच लागले. 'जनता म्हणते की, आमदार माजले आहेत' हे आपण आपल्या वर्तनावरून जनतेला दाखवून...

पुन्हा छत्रपतींचा एक नवा पुतळा प्रस्तावित!

दोनच दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर) या रेल्वेसंकुलात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा केली. बोरींबंदर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होत आहे, अनेक नवीन गोष्टी उभ्या राहत आहेत हे मान्य आहे व...

मंत्रालय परिसरासारखे चकाचक रस्ते इतर ठिकाणी नकोत का?

कालच्या शनिवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मंत्रालयजवळील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये गेलो होतो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम काहीसा लवकर संपल्याने हाताशी बराच वेळ होता. म्हटलं.. एकेकाळी दररोज या परिसरात येत होतो, जरा उसंत मिळाली आहे, या परिसरातील 'प्राणवायू' प्राशून घरी जाऊया.. कारण,...