Homeचिट चॅटउद्यापासून बोरीवलीत घ्या...

उद्यापासून बोरीवलीत घ्या साहित्यिक मेजवानी

मुंबई, महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव संपताच उद्यापासून म्हणजेच मंगळवार, २१ मे २०२४पासून मुंबईतल्या बोरीवलीतल्या जय महाराष्ट्र नगर येथे ही वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४१ वर्षांपासून सुरु असलेल्या या वसंत व्याख्यानमालेचे यंदा ४२वे वर्ष आहे.

एक संध्याकाळ शाहीरांसमवेत या नामाभिधानाने वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी, २१ मे २०२४ रोजी सायंकाळी पहिले पुष्प गुंफताना लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. ‌गणेश चंदनशिवे आणि त्यांचे सहकारी पोवाडे सादर करतील. बुधवार, २२ मे २०२४ रोजी ‘मी भारतीय’ या विषयावर पुण्याचे रवींद्र देवधर हे दीर्घांक सादर करुन आपण सारे भारतीय आहोत ही त्यांची संकल्पना मांडतील. गुरुवार, २३ मे २०२४ रोजी चॉकलेट हिरो देव आनंद, ही संकल्पना घेऊन ख्यातनाम चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर देव आनंद यांच्या सदाबहार अभिनेत्याच्या आठवणी, किस्से आपल्या खुमासदार शैलीत रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील तर संगीत संयोजक संतोष पिसाट आणि प्रमोद कुंभार हे देव आनंद यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील निवडक गाणी सादर करतील.

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीवर तब्बल पाचशे वेळा जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा खराखुरा परिचय शिवभक्तांना करुन देत एक ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला आहे. या त्यांच्या रायगड दर्शन @५००निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी त्यांच्या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

विजय वैद्य आणि प्रा. नयना रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा ही वसंत व्याख्यानमाला ४२ वर्षांची होत आहे. हे औचित्य साधून शनिवार, २५ मे २०२४ रोजी प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रसिक श्रोत्यांशी थेट संवाद साधतील.

रोज सायंकाळी ७.३० वाजता ही वसंत व्याख्यानमाला सुरु होणार असून रसिक प्रेक्षक, श्रोतृवृंदांनी वेळेपूर्वी आपापले स्थान ग्रहण करुन या बौद्धिक मेजवानीचा यथायोग्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content